विठ्ठलापूर मध्ये अज्ञाताकडून आकसापोटी वाईट कृत्य
माणदेश एक्सप्रेस न्युज
विठ्ठलापूर/प्रकाश बाड : विठ्ठलापूर ता. आटपाडी, जि. सांगली येथे अज्ञाताकडून आकसापोटी वाईट कृत्य करण्यात आले असून शेततळयातील मासे औषध टाकून मारून टाकण्याचा अघोरी प्रकार घडला आहे.
येथील शेतकरी सुभाष सावंत यांनी त्यांच्या मालकीच्या शेततळ्यामध्ये मत्स बीज सोडले होते. पंरतु अज्ञाताने शेततळयामध्ये विषारी औषध टाकल्याने अंदाजे अडीच टन मासे मृत झाल्याने दोन लाख ५० हजाराचे नुकसान झाले आहे. याबाबत आटपाडी पोलिसात तक्रार देण्यात आली असल्याचे शेतकरी सुभाष सावंत यांच्याकडून सांगण्यात आले.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज