टेंभू योजनेच्या च्या पाण्याचा प्रवास दिघंचीकडे सुरू...
यावर्षी दिघंचीकरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार नाही : सरपंच अमोल मोरे
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : मागील वर्षी कडक उन्हाळ्यात टेंभू योजनेच्या च्या पाण्याने दिघंचीकरांची तहान भागवली होती. यावर्षी देखील टेंभू च्या पाण्याचा प्रवास दिघंचीकडे सुरू झाला आहे. आमदार अनिलभाऊ बाबर, तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नांनी पुन्हा एकदा निंबाळकर तलाव भरणार आहे. अशी माहिती सरपंच अमोल मोरे यांनी दिली.
जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम !
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा !
यावेळी टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईप लाईन मधून येणाऱ्या पाण्याची पाहणी सरपंच अमोल मोरे, युवा नेते विकास मोरे, ग्रा.प. सदस्य, मुन्नाभाई तांबोळी, सागर ढोले यांनी केली. त्यामुळे दिघंचीकरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार नसल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज