गणेश डाळिंबाला ५ रुपये किलोनेही कुणी विचारेना : डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची बाजारपेठांअभावी दयनिय अवस्था
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : कोरोनाच्या संकटामुळे सर्व जग होरपळत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची होरपळत होत असून यामध्ये मुख्य करून फळबाग शेतकऱ्यांचे बाजारपेठांअभावी मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. गणेश जातीचे डाळिंब ५० ते ६० रुपये किलो दराने जाणारे डाळिंब कोरोनाच्या संकटामुळे ५ रुपये किलो दराने कोणी विचारेनासे झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या डाळिंब पिकाचे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी विनंती शेतकरी वर्गातून केली जात आहे.
अजनाळे ता. सांगोला येथील डाळिंब उत्पादक शेतकरी संजय बाबुराव येलपले म्हणाले, कोरोनामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून डाळिंबाला योग्य दर नसल्यामुळे शेतकरी संकटाच्या काळात कर्जाच्या खाईत लोटला गेला तर तो पुन्हा उभारी घेईल का नाही हे सांगता येत नाही. माझ्याकडे गणेश जातीचे ६ टन डाळिंब असून कोरोना मुळे बाजारपेठा पूर्णपणे बंद असल्यामुळे व्यापारी ५ रुपये किलो दराने सुद्धा कोणी घ्यायला तयार नसल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे. लाखो रुपये खर्च करून जोपासलेल्या डाळिंब पिकाला योग्य दर नसल्यामुळे कोरोनाच्या महामारी संकटामुळे गणेश जातीचे डाळिंब फुकट सुद्धा कोणी घेण्यास तयार नाही. यावर्षी डाळिंब बागेला केलेला खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी डाळिंब उत्पादक शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
माझ्याकडे गणेश जातीचे डाळिंबाची ३०० झाडे असून त्यामध्ये ५ टन डाळिंब चांगल्या दर्जाचा माल आला असून व्यापारी ४ ते ५ रुपये किलो दराने मागत आहेत. सरासरी मला दरवर्षी ४० ते ५० किलो रुपये प्रमाणे दर मिळतो. परंतु कोरोना विषाणू च्या संकटामुळे यावर्षी माझे ३ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तरी शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.
संजय बाबुराव येलपले
डाळिंब उत्पादक शेतकरी अजनाळे
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज