अजनाळे गावामध्ये कोरोना च्या लढाईत सरपंच अर्जुन कोळवले यांचे योगदान महत्वाचे
माणदेश एक्स्प्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : देशात आणि राज्यात कोरोना विषाणुने मोठा शिरकाव केला असून सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सोलापूर शहरात झपाट्याने वाढत असून त्या अनुषंगाने काळजी घेणे गरजेचे आहे. राज्यात संचारबंदी व लॉकडाऊन ३ मे पर्यंत जाहीर केले आहे त्यामुळे मुंबई, पुणे व अन्य राज्यातुन गावाकडे येणाऱ्यांची संख्या दिवसंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात जबाबदारी निर्माण झाली आहे.
मात्र या कोरोनाच्या लढाईत अजनाळे गावचे विद्यमान सरपंच अर्जुन महादेव कोळवले यांनी गावांमध्ये विशेष लक्ष देऊन दररोज गावामध्ये न चुकता मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना समज देऊन घरी पाठवत असून परगावाहून आलेल्या नागरिकांना चौकशी करूनच गावात प्रवेश दिला जात आहे. गावामध्ये कुठल्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची ते विशेष काळजी घेत आहेत. प्रशासनाला सोबत घेऊन होमक्वारंटाईन असलेल्या नागरिकांची विचारपूस करून कोणाला ताप, सर्दी, खोकला, यासारखी कोरोना ची लक्षणे आहेत का याची ते काळजीपूर्वक चौकशी करत आहेत. सुरुवातीपासूनच "गावासाठी काय पण" या वाक्याप्रमाणे गावासाठी ते विशेष काळजी घेताना पाहावयास मिळत आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा अशा सूचना करीत आहेत.
जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम!
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा ! आभार गीत
कोरोना च्या संकटात सरपंच राष्ट्रीय काम चोख बजावत आहेत. कोणत्याही गोष्टींमध्ये कमीपणा न मानता गावातील नागरिकांना हात जोडून विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नका असे सांगतात. अजनाळे गावातील नागरिकही हुज्जत न घालता नियमांचे पालन करतात. गाव हेच कुटुंब मानून संपूर्ण गावाची काळजी घेत असून त्यांना कर्तव्यदक्ष ग्रामसेवक शहाजीराव इंगोले, गाव कामगार तलाठी किरण बाडीवाले, पोलीस पाटील संतोष भंडगे, कोतवाल नवनाथ इंगोले, आरोग्य सेवक अशोक कलाल यांच्यासह आशा वर्कर त्यांना मदत करत असतात.
सध्या देशामध्ये व राज्यामध्ये त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना ने धुमाकूळ घातला असून सांगोला तालुक्यातील घेरडी या गावांमध्ये एक रुग्ण सापडल्यामुळे त्याचा शिरकाव अजनाळे परिसरामध्ये होऊ नये म्हणून आम्ही पहिल्यापासूनच गावामध्ये खबरदारी घेतली असून त्याला गावातील ग्रामस्थ, व्यापारी ही साथ देतात. खबरदारी उपाय म्हणून गावामध्ये निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे. अन्य राज्यातून व शहरातून आलेल्या नागरीकावरती विशेष असे लक्ष ठेवले जाते.
सरपंच अर्जुन महादेव कोळवले
देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस