Type Here to Get Search Results !

११० पैकी ४६ साखरकारखान्यांना गाळप परवाना

 



 ११० पैकी ४६ साखरकारखान्यांना गाळप परवाना


सोलापूर : एफआरपी थकविणाऱ्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने कोल्हापूर विभागातील आहेत, त्यानंतर सोलापूर व अहमदनगर विभागातील आहेत. बुधवारपर्यंत अर्ज दिलेल्या ११० पैकी ४६ कारखान्यांना गाळप परवाना दिला आहे.


 


मागील वर्षी ‘आरआरसी’ची कारवाई झालेल्या ११, टप्प्याटप्प्याने ‘एफआरपी’ देणाऱ्या व थकविणाऱ्यांचे या ३२ अशा ४३ साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामासाठी गाळप परवाने मागितले आहेत. एकरकमी एफआरपी देण्याच्या कायद्यानुसार राज्यातील या कारखान्यांचे परवाने लटकण्याची शक्यता असली तरी साखर आयुक्त यावर तोडगा काढण्याची शक्यता आहे.


 


 राज्यात मागील पाच वर्षांपासून अनेक कारखान्यांनी एफआरपी थकवली आहे. यापैकी बºयाच कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला नाही. बरेच कारखाने कायमस्वरूपी बंद पडले आहेत. पण २०१८-२०१९ या वर्षीच्या  ‘एफआरपी’साठी राज्यातील १५ साखर कारखान्यांची ‘आरआरसी’ केली होती. यापैकी चार साखर कारखान्यांनी शेतकºयांचे ऊस बिल चुकते केले आहे. मात्र ११ कारखाने आजही थकबाकीत आहेत.


 


याशिवाय मागील वर्षी गाळप घेतलेल्या ३२ साखर कारखान्यांनी शेतकऱ्याचे संपूर्ण ऊस बिल दिले नाही. त्यामुळे एफआरपी थकविणाऱ्यांचे या ४३ कारखान्यांचे गाळप परवाने ‘एफआरपी’त अडकणार आहेत. या कायद्याची अंमलबजावणी करूनच यावर्षी गाळप परवाने देण्याची भूमिका साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतली आहे.मात्र शेतकऱ्यासोबत झालेल्या करारानुसार दिवाळी सणासाठी उर्वरित रक्कम देण्याची साखर आयुक्तांची खात्री झाली तर साखर आयुक्त मार्ग काढू शकतात.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies