पुरात वाहून गेलेले देवापूर येथील शेतकरी सुनिल बाबर यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने मदतीचा धनादेश सुपूर्त
माणदेश एक्सप्रेस टीम
म्हसवड/प्रतिनिधी : देवापुर ता. माण येथील शेतकरी सुनिल सोपान बाबर हे दि. 15 ऑक्टोबर रोजी मुसळधार अतिवृष्टीमुळे ओढ्याला आलेल्या पुरात वाहुन मृत झाले. शासनाच्या नियमानुसार त्यांच्या पत्नी सिंधुबाई सुनील बाबर यांना ४ लाख रुपये मदतीचा धनादेश शासन प्रशासनाचे वतीने देण्यात आला.
हवामान खात्याकडून आजही पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने विशेषत: नदी, ओढयाच्या काठच्या नागरिकांनी पाण्यात उतरु नये अथवा आपली जनावरे पाण्यात घेऊन जावू नयेत. नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज