लस आली नसताना शाळा सुरू करण्याची घाई का? : पालकवर्गातून संतप्त प्रतिक्रिया
मुंबई : राज्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा विचार केला जाईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्याचे म्हंटले आहे मात्र कोरोनावर लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नये अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. यावर पालकवर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून लस आली नसताना शाळा सुरू करण्याची घाई का? विद्यार्थ्यांना बाधा झाल्यास जबाबदार कोण असा सवालही पालक वर्गातून केला जात आहे.
अजून लस आली नाही, आणि यांना शाळा सुरू करायची घाई लागली आहे. विद्यार्थ्यांना लागण झाल्यास शाळा व्यवस्थापन व शिक्षणमंत्री यांनी लेखी जबाबादरी घ्यावी, असे ट्विट शिक्षणमंत्र्यांना करण्यात आले आहे. शाळा सुरू करण्याची एवढी का घाई ? असा सवाल पालक करत आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज