मंदिरांच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक : ट्विट करुन ठाकरे सरकारवर टीका
मुंबई : पुनश्च हरि ओम असं म्हणता आणि हरिलाच कोंडून ठेवता? मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी ठाकरे सरकारला हा प्रश्न विचारला आहे. मंदिरांच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मनसेने मंदिरं कधी उघडणार यावरुन ठाकरे सरकारला पुन्हा एकदा प्रश्न विचारला आहे. बाळा नांदगावकर यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
राज्यात बार उघडले गेले, बारची वेळही ठरवून देण्यात आली. त्यानंतर जलतरण तलाव आणि मल्टिप्लेक्स यांनाही संमती देण्यात आली. करोना फक्त मंदिरातच होतो का? हा फक्त भावनेचा प्रश्न नाही तर मंदिरांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांच्या रोजी-रोटीचाही प्रश्न आहे असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
ठाकरे सरकारवर मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरुन मनसे बाळा नांदगावकर यांनी ट्विट करुन टीका केली आहे. बारची वेळ ठरवून दिली गेली आहे, जलतरण तलाव खुले केले आहेत. मल्टिप्लेक्सलाही संमती देण्यात आली आहे. मग फक्त मंदिरात कोरोना असतो का? या सरकारचा या मागे काय तर्क असावा हे एक कोडच असल्याचेही बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज