मुंबई : बिहार निकालाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले, भाजपाच्या यशामागे देवेंद्र फडणवीस यांची उत्तम रणनीती असल्याचं कौतुक भाजपा नेते करत आहेत, तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाचं कौतुक महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. बिहारच्या निकालानंतर आता राज्यातील भाजपा नेत्यांनी आगामी महापालिका निवडणुकांकडे लक्ष केंद्रीत केलं आहे.
मुंबईत आज भाजपाच्या कार्यकारणीची बैठक आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. मुंबईत अनेक वर्षापासून महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे त्यामुळे ही सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे.
मुंबईतील भाजपाची संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शिवसेनेला कोडींत पकडण्यासाठी भाजपा रणनीती आखणार आहेत.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज