Type Here to Get Search Results !

कार्तिकी यात्रा प्रतिकात्मक स्वरुपात साजरी व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडून राज्यसरकारकडे प्रस्ताव

  



पंढरपूर : मागील आठ महिन्यांपासून श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिर बंद असल्याने यंदा कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी होईल. कार्तिकी यात्रा मोजक्याच दिवसांवर आली असून तीन दिवसांपूर्वी श्री विठ्ठल मंदिर खुले करण्यात आले आहे. यामुळे कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात वारकऱ्यांची मोठी गर्दी होऊ शकते. 






यात्रेला येणाऱ्यांमध्ये वयस्कर भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या गर्दीत वयस्कर भाविकांना श्वास घेण्यास अडचणी येतील. दर्शन रांगेत तथा वाळवंटात, मठात वारकऱ्यांची गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊ शकणार नाही. 






 परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. गर्दीच्या तुलनेत प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणा अपुरी पडेल. त्यामुळे यंदाची कार्तिकी यात्राही आषाढी यात्रेप्रमाणे प्रतिकात्मक स्वरुपात साजरी व्हावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे.





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies