Type Here to Get Search Results !

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन संताप



शिवसेना खासदार संजय राऊत यांचा शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन संताप




मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्राप्रमाणे पंजाब, हरियाणामधील शेतकरी आहे. ज्यांनी हा देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी प्रयत्न केला, जी प्रमुख राज्ये आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का?, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.





आमचे केंद्र सरकारच्या नव्या कृषि विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरूच राहणार असून दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग आम्ही बंद करू, दिल्लीच्या सीमांवर असे गेले ४ दिवस ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी रविवारी सांगितले. जगासमोर पंजाबच्या शेतकऱ्यांनी आदर्श ठेवत शांततेत केलेले आंदोलन या देशाच्या इतिहासात कधी झाले नव्हते. शेतकऱ्यांवर ज्याप्रकारे बळाचा वापर केला जात आहे हा बळाचा वापर जर चीनच्या सीमेवर केला असता तर लडाखमध्ये चीनचे सैन्य घुसले नसते, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.





ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे सर्वांनीच समर्थन केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात आधी समर्थन केले पाहिजे. तिथे जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे. जेव्हा तुम्ही सत्तेत नव्हता आणि दिल्लीत येण्याचा मार्ग तयार करत होतात तेव्हा याच शेतकऱ्यांवर अत्याचार होणार नाही अशा घोषणा दिल्या होत्या. मग दिल्लीच्या सीमेवर आज काय सुरु आहे? शेतकरी दहशतवादी नाही. शेतकरी आहे म्हणून देश आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies