मुख्यमंत्र्यांनी केल सुरक्षित दिवाळी साजरा करण्याचं आवाहन
मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हीच बाब अधोरेखित करत राज्यातील जनतेनं भान ठेवून हा सण साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. शिवाय शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी ऑनलाईन माध्यमांचाच वापर करावा असंही त्यांनी मोठ्या आग्रहानं सर्वांनाच उद्देशून सांगितलं आहे.
कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. गेल्या सात आठ महिन्यात आपण सर्व धर्मियांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचे पालन करून साजरे केले, परिणामी कोरोनाला रोखून धरता येणं शक्य झालं असं सांगत त्यांनी इथल्या परिस्थितीची तुलना युरोपातील भीषण परिस्थितीशी केली.
दिवाळीत आपण बेसावध राहिलो तर तर पुढच्या काळात आपल्याकडेही रुग्णसंख्या बेसुमार वाढून खूप कठीण आव्हान ठरेल हे ध्यानी घ्या असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सुरक्षित दिवाळी साजरा करण्याचं आवाहन केलं. हा सण मोठा असला तरीही परिसरात, आपल्या जवळचे, मित्रमंडळी- नातेवाईक यांच्या घरात कोरोनामुळे दु:खद घटना घडलेली असेल. त्यांना या दिवाळीचा आनंद घेता येणार नाही त्यामुळे उत्साह दाखवतांना त्यांचाही विचार मनात राहू द्या असंही त्यांनी न विसरता सांगितलं.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज