Type Here to Get Search Results !

२३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड


 


२३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड




मुंबई : २३ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण याला विचारात घेऊनच शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करूनच अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू होणार आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळा पूर्णपणे निर्जंतुकीकरण करून कोरोनापासून बचावाची पूर्णपणे खबरदारी घेण्यासाठीच्या सुविधा उपलब्द करून घेणे शाळांना आवश्यक असणार आहेत. सोबतच, शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांच्या 17 ते 22 नोव्हेंबर दरम्यान RTPCR कोव्हीड टेस्ट प्रयोगशाळेत करून घेणे सुद्धा यामध्ये बंधनकारक केले आहेत.



चाळीस मिनिटांची चार तासच शाळा होणार आहे. शाळेला मैदान किंवा मोकळी जागा असल्यास हे वर्ग खुल्या मैदानावर, मोकळ्या जागेत तसेच खेळत्या हवेच्या वर्गात घेण्याचीही मुभा शाळा व्यवस्थापनास दिली आहे. स्थानिक प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, व्यवस्थापक व सरकार यांच्या सामुदायिक जबाबदारीवर एक दिवसआड करून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies