Type Here to Get Search Results !

राज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन : अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा आणि आरोग्यबाबत चिंता व्यक्त


 


राज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन : अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा आणि आरोग्यबाबत चिंता व्यक्त



मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटक प्रकरणात बरेचजण चर्चेत आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा आणि आरोग्यबाबत चिंता व्यक्त केली आहे. अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. महाराष्ट्र सरकार विरुद्ध राज्यपाल असे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.




 याआधी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे राज्य सरकार काहीसे अडचणीत आले होते. पण आता राज्यपालांनी अर्णब गोस्वामी अटक प्रकरणात झालेल्या कारवाईवरुन थेट गृहमंत्र्यांनाच फोन केला आणि अर्णब यांची सुरक्षा तसेच आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली. तसंच अर्णब यांना कुटुंबीयांशी बोलू आणि भेटू द्यावे अशी सूचनाही केली.विशेष म्हणजे यापूर्वीही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरुन राज्यपालांनी चिंता व्यक्त केली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा देशमुखांना फोन करुन त्यांच्या सुरक्षा आणि आरोग्याविषयी काळजी व्यक्त केली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies