Type Here to Get Search Results !

“राहुल यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले” : केशव उपाध्यें


 


“राहुल यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले” : केशव उपाध्यें




बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाचं सरकार कायम राहणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहेसकाळी मतमोजणीला सुरुवात होताच राजद आणि काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली होती. त्यावेळचे कल पाहता राज्यात सत्तातंर होईल असं दिसत होतं. मात्र त्यानंतर भाजप आणि जेडीयूनं आघाडी घेतली. सध्याच्या घडीला एनडीए १३० जागांवर पुढे आहे. तर महागठबंधननं शंभरी गाठली आहे. यावरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंनी महागठबंधनला टोला लगावला आहे. 



 


'राहुल यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले. अखिलेश यादव यांच्यासोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली तेव्हा सपा पराभूत. डाव्यासोबत पश्चिम बंगाल मध्ये गेले डावे सपाटून ममता बॅनर्जींसमोर हरले. तेजस्वी यादव यांच्यासोबत काँग्रेस गेली आणि तिथेही आता पराभव', असा टोला उपाध्येंनी लगावला आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies