“...ते खरोखरच देशद्रोही झाले तर तुम्हाला खायला कोण घालेल?” : केजरीवाल
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संघटक अरविंद केजरीवाल यांनी सरकारला खुले आवाहन दिले आहे. केजरीवाल यांनी सिंघू सीमेवर कृषी कायद्यांविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देऊन शेतकऱ्यांना संबोधित केले. शेतकऱ्यांना कृषी कायद्याबाबत फारसे काही काळात नाही. केंद्र सरकारमधील ज्या कोणाला कृषी कायद्यांबाबत जास्त कळते त्यांनी शेतकऱ्यांशी वादविवाद करण्यास पुढे यावे. मग कोणाला किती आणि काय कळते ते उघड होईल, असा उपरोधिक टोला केजरीवाल यांनी सरकारला लगावला. सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकावे आणि नवे कृषी कायदे रद्द करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना तब्बल ३२ दिवस रस्त्यावर झोपावे लागत आहे. या आंदोलनात ४० जणांचे प्राण गेले आहेत. हे सारे वेदनादायक आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीचा मन राखावा आणि कायदे रद्द करावे, असे ते म्हणाले. आंदोलक शेतकऱ्यांना देशद्रोही ठरविले जात आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर “या” नेत्याचा होणार राष्ट्रवादीत प्रवेश, असा सवालही त्यांनी केला. ते खरोखरच देशद्रोही झाले तर तुम्हाला खायला कोण घालेल, असा सवालही त्यांनी केला.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज