नाईट कर्फ्यू दरम्यान कोणी गाडीवर फिरताना दिसल्यास होणार अशी कारवाई
मुंबई : ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे राज्यात सर्वत्र खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबई पोलिसांनी वाहन चालकांना सक्त इशारा दिला आहे. रस्त्यावर रात्री ११ ते सकाळी सहा यादरम्यान कोणी गाडीवर फिरताना दिसल्यास त्या व्यक्तीची गाडी जप्त केली जाईल . पण ही कारवाई अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर होणार नसल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. रात्रीच्या संचारबंदी आदेशाचे कठोर पालन केले जाईल. पोलिसांची गस्त रात्रीच्या वेळी वाढवली जाईल.
नाकाबंदीमध्येही वाढ केली जाईल. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळता रात्री ११ ते पहाटे ६ यादरम्यान रस्त्यावर कोणी गाडीवर फिरताना दिसल्यास त्याची गाडी जप्त केली जाईल. त्याचबरोबर मुंबई पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांनी नागरिकांना रात्री रस्त्यावर येऊ नये आणि घरातूनच नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन केले आहे. संचारबंदीच्या निर्णयामुळे सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणाऱ्या जल्लोषावर पूर्णपणे निर्बंध आले आहेत.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज