अभिनेत्री कंगनाला आपलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार : ट्विट विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली
मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र अली कासिफ खान देशमुख नामक एका व्यक्तीनं कंगनाच्या वादग्रस्त ट्विट विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली, मुंबईकरांना ती पप्पू सेना म्हणते, ती शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी करते, हिंदु-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते. असे आरोप या याचिकेमध्ये करण्यात आले होते.
परंतु हे आरोप सिद्ध करण्यासाठी अपेक्षित पुरावे नव्हते त्यामुळे ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. “आपण स्वतंत्र भारतात राहतोय. या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. अन् तो कंगनाला देखील आहे. पण कंगनाने स्वत:ची भूमिका मांडताना शब्दांचा वापर विचार करुन करावा.” अशी समज कोर्टाने तिला दिली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज