नको रे मना क्रोध हा खेदकारी। : आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांवर श्लोक स्वरुपात टीका
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूर कारशेडच्या वादावर चर्चेतून तोडगा काढू या,” असं आवाहन रविवारी केंद्र सरकारला केलं. “विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे,” असंही मुख्यमंत्री म्हणाले होते. यावरून भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
“विषय क्रेडिटचा नाही. विषय मेट्रोचा, कोस्टल रोडचा किंवा बुलेट ट्रेनचा. प्रश्न मुंबईकरांचे, आम्ही ते विचारतो आणि विचारणारच. म्हणून राग येणाऱ्यांना समर्थांचा हा उपदेश. नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु॥,” असं शेलार म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.
विषय क्रेडिटचा नाही
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 21, 2020
विषय मेट्रोचा, कोस्टल रोडचा किंवा बुलेट ट्रेनचा..
प्रश्न मुंबईकरांचे,आम्ही ते विचारतो आणि विचारणारच!
म्हणून राग येणाऱ्यांना समर्थांचा हा उपदेश..
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज