Type Here to Get Search Results !

कॅाग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांच शेतकरी प्रेमच मुळात नकली : शेतकऱ्यांना दिलेल्या पाठिंब्यावरून भाजपाची सरकारवर टीका





 कॅाग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांच शेतकरी प्रेमच मुळात नकली : शेतकऱ्यांना दिलेल्या पाठिंब्यावरून भाजपाची सरकारवर टीका 



मुंबई :  शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या शेतकरी आंदोलनास दिग्गजांचाही मोठा प्रतिसाद मिळत असून राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिलाय. त्यावरुन भाजपाने शिवसेनचं शेतकरी प्रेम नकली असल्याचं म्हटलंय. 



बंदला पाठींबा देणारे  सत्ताधारी कॅाग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांच शेतकरी प्रेमच मुळात नकली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला पुरेशी मदत दिली नाही. दुध उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. ना शेतकऱ्यांना कोणती मदत राज्य सरकारने कोरोना काळात केली नसल्याचं भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन म्हटलंय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात खासगीकरण सुरू झालं. शरद पवारांचं कृषिमंत्री असताना पाठवलेले पत्र आज समोर आहे, ज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी खासगीकरणाला चालना देण्याबाबत त्यांनी लिहीले आहे, असे म्हणत शरद पवारांनीच खासगीकरणाला सुरुवात केल्याचं उपाध्ये यांनी सूचवलंय.

 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies