सरकार…उद्धवजी आणि पवार साहेब दोघांनाही याचं उत्तर द्यावं लागेल! : चंद्रकांत पाटील
मुंबई : मराठा आरक्षणावरून मराठा संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच पोलिसांकडून सोमवारी रोखण्यात आलं. सकाळपासूनच मुलुंड आणि मानखुर्द येथे पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. दरम्यान यावेळी एका बसवरील भगवा झेंडा काढण्यात आल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “भगवा काढून बस रवाना केली…धक्कादायक! हे कोणत्या प्रकारचं राजकारण करत आहे सरकार…उद्धवजी आणि पवार साहेब दोघांनाही याचं उत्तर द्यावं लागेल! काँग्रेस तर पूर्वीपासून हेच करते मात्र या लोकांकडून अशी अपेक्षा नव्हती”.
यासाठी काही संघटनांनी शहरात जोरदार आंदोलन करण्याचे ठरवलं होतं. मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करून सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न या संघटनांकडून सुरु आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्य़ांमधून मोठय़ा प्रमाणात मराठा समाजाचे कार्यकर्ते शहरात येण्याची शक्यता होती.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज