“केंद्राचं पथक म्हणजे पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं असला प्रकार” : राष्ट्रवादीच्या आमदारांची मोदी सरकारवर टीका
मुंबई : २१ डिसेंबर ते २६ डिसेंबर या दरम्यान केंद्राचं पथक राज्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ ऑक्टोबरला जनतेला संबोधित करताना सांगितलं होतं की अवकाळी पावसामुळे राज्यातील ४१ लाख हेक्टवरील क्षेत्राचं नुकसान झालं आहे आम्ही केंद्राला तीनवेळा विनंती केली होती. मात्र पथक आलं नाही असं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. आता केंद्र सरकारचं पथक राज्यात दाखल झालं आहे. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
केंद्राचे पथक उशिरा येणं ही अन्नदात्याची चेष्टा
- आमदार @RRPSpeakshttps://t.co/klLfYlENFN
ऑक्टोबर महिन्यात जो पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्याचं जे नुकसान झालं त्याची पाहणी करायला हे पथक आलं आहे. दोन महिन्यांनी येत असलेलं केंद्राचं पथक म्हणजे पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं असला प्रकार आहे. केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करु नये. आता पथक नको तर मदत पाठवा असं ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
पथक नको मदत पाठवा...
— आपला रोहित - AAPLA ROHIT (@RohitPawarSpeak) December 21, 2020
-@RRPSpeaks@mataonline @LoksattaLive @MiLOKMAT @TV9Marathi @zee24taasnews @abpmajhatv @SakalMediaNews @MaxMaharashtra@prabhatkhabar @JaiMaharashtraN@Policenama1 https://t.co/3GPaQWvhiS
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज