Type Here to Get Search Results !

आता शेतकरी देखील पाकिस्तानातून आणता का? : मुख्यमंत्री

 



आता शेतकरी देखील पाकिस्तानातून आणता का? : मुख्यमंत्री 



मुंबई : सध्या देशात शेतकरी आंदोलनावरून राजकारण तापलं आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनावरूनही ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. देशातील अन्नदात्याला देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही. असं ते म्हणाले.



देशातील अन्नदात्याला देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही... असं वक्तव्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. दोन दिवसीय हिवाळा अधिवेशन आज सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.




शिवाय शेतकऱ्यांच्या हक्कांबद्दल कोणी आवाज उठवला तर ते देशद्रोही. विरोधात बोललं आणि तुरुंगात टाकणं ही आणीबाणी नाही का? असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. तुम्हीच कांदा पाकिस्तानातून आयात करता आणि आता शेतकरी देखील पाकिस्तानातून आणता का? असा म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies