“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, शेती विषयक कायदे आपण रद्द करा” : अभिनेते प्रकाश राज
मुंबई : नव्या कृषी कायदांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी एकत्र येत भारत बंद पाळला होता. शेतकऱ्यांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज एक दिवसाचा उपवास करणार आहेत. संपूर्ण देशभरातून शेतकऱ्यांना पाठिंबा मिळत असताना अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक आवाहन केलं आहे.
Dear PRIME MINISTER @narendramodi ji .. REPEAL the forced #FarmerBill2020 ..SIT with our farmers.. HEAR them out .ASSES ground realities.. WIN their TRUST. 🙏🏻🙏🏻🙏🏻 #JustAsking #FarmersProstests #FarmLaws #WeUnitedForFarmers
“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, शेती विषयक कायदे आपण रद्द करा. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत तुम्ही स्वत: बसा. त्यांच्या नक्की काय समस्या आहेत ते जाणून घ्या. तळगाळातील लोकांचं तुमच्याबद्दल, सरकारबद्दल आणि एकंदर कायद्याबद्दल नक्की काय मत आहे हे समजून घ्या. आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास जिंका”, असा सल्ला प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी सारे एकत्र येत असल्याचे म्हटले आहे. तसेच, शेतकरी आंदोलन, शेतीविषयक विधेयके हे दोन हॅशटॅगही त्यांनी वापरले आहेत.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज