Type Here to Get Search Results !

“शरद पवारांचे आत्मचरित्र वाचावे की, न वाचावे असा प्रश्न पडला आहे” : सदाभाऊ खोत




 “शरद पवारांचे आत्मचरित्र वाचावे की, न वाचावे असा प्रश्न पडला आहे” : सदाभाऊ खोत



सांगली : "शरद पवार यांनी खरं बोलावं. कारण ज्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी पवारांना शेतकऱ्यांचा जाणता राजा नव्हे, तर शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा राजा म्हटलं जाईल", अशी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सांगलीत भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेमध्ये ते बोलत होते.



पवार साहेबांचे काही मनावर घेऊ नका. ते जे बोलतात त्याच्या नेहमी उलटे करतात. जर त्यांनी म्हटले की सूर्य उद्यापासून पूर्वेकडे उगवणार तर सूर्य पश्चिमेकडे उगवणार. आपल्या आत्मचरित्रात पवारांनी मार्केट कमिट्या बंद झाल्या पाहिजेत, शेतकऱ्यांचा शेतमाल कुणालाही खरेदी करता आला पाहिजे असे म्हटले आहे. पण पवार दुसरीकडे म्हणतात की त्यांचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्यामुळे शरद पवारांचे आत्मचरित्र वाचावे की न वाचावे असा प्रश्न पडला आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज




إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies