Type Here to Get Search Results !

‘निष्पाप व्यक्तीचं नाव घेऊन त्यांना संशयाच्या भोवऱ्यात टाकणं फार उचित नाही’ : अजित पवार




मुंबई : राज्यात सध्या पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. एकीकडे भाजपा वारंवार वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केलं असून एकाप्रकारे संजय राठोड यांची पाठराखण केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.



“आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे ही वस्तुस्थिती तर खऱी आहे. मागेदेखील धनंजय मुंडेंच्या बाबतीत अशाच पद्दतीचे आरोप झाले. माहिती न घेता राजीनामा घेतला असता तर त्यांची बदनामी झाली असती. चौकशी होऊन संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत एखाद्याला दोषी धरायचं किवं त्या पदावरुन हटवायचं हे कितपत योग्य आहे याचा विचार झाला पाहिजे,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.


 “संजय राठोड गुरुवारी खुलासा करणार आहेत अशी माहिती मला मिळाली होती. माझा आणि त्यांचा काही संपर्क झाला नाही, पण त्यांच्यावर जे आरोप झाले त्याबाबत रितसर चौकशी झाली पाहिजे असं आम्ही सांगितलं आहे. पण जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत निष्पाप व्यक्तीचं नाव घेऊन त्यांना संशयाच्या भोवऱ्यात टाकणं फार उचित नाही,” असंही ते म्हणाले आहेत.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies