“महापौर म्हणतात लॉकडाउन पण बार, पब, नाईट लाईफ - नो लॉकडाउन” : ‘या’ भाजप नेत्याची ठाकरे सरकारवर टीका
मुंबई : राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. तर, मुंबईतील महापौरांनी देखील लॉकडाउनचा इशारा दिलेला आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
“कोरोनाचे रुग्ण वाढ आहेत महापौर म्हणतात लॉकडाउन पण बार, पब, नाईट लाईफ – नो लॉकडाउन!. महाविकासआघाडी सरकारने ४० हजार लशींच डोस वाया घालवल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यातही ते अयशस्वी ठरले आहे. साडेचार लाख आरोग्य कर्मचारी सुरक्षित नाहीत. आरोग्य मंत्र्यांना दंड, गुन्हे दाखल, मार्शल लॉ हवा आहे, पण महाविकासआघाडी सरकारने नव्या पेंग्विन कारवान कायद्यावर १०० तास खर्च केलेत.” अशा शब्दांमध्ये शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे.
Corona cases RISING Mayor Says LOCKDOWN
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 21, 2021
BUT Bar/Pub/Nightlife-NO LOCKDOWN !
MVA Govt WASTES 40,000 Vaccine doses 😡
FAILS Phase 1 Vaccination Target !
4.5lac health workers UNPROTECTED😖
Health Min wants Fines/FIR/Martial law
BUT
MVA Govt spends 100hrs on New🐧Caravan law!
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस