Type Here to Get Search Results !

कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या ; आठ महिन्यांपासून वेतन थकल्याने उचलले पाऊल



लातूर :  आर्थिक विवंचनेतून बाबुराव नामदेव गायकवाड या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने नगरपरिषद आवारातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांचा आठ महिन्यापासुन पगार थकित होता. सकाळी ही घटना कळल्यावर संतप्त कर्मचाऱ्यांनी नगरपरिषद निलंगा येथे ठिय्या आंदोलन केले.


निलंगा नगरपरिषद येथे 36 सफाई कर्मचारी हे कायमस्वरूपी आहेत तर 70 कर्मचारी हे कंत्राटी स्वरुपात कार्यरत आहेत. या 70 कामगारांचे नियंत्रण खासगी एजन्सीला देण्यात आले आहे. नगरपरिषद निलंगा यांनी सदरील एजन्सीला सर्व बिले अदा केली असताना देखील एजन्सीने कामगारांचे वेतन वेळेवर दिले नाही. यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.


बाबुराव नामदेव गायकवाड हे मागील 35 वर्षांपासून नगरपरिषद निलंगा येथे मस्टर वरील सफाई कामगार या पदावर काम करत आहे. काही वर्षांनंतर त्यांना कंत्राटी स्वरुपात कार्यरत करण्यात आले. आज ना उद्या आपन कायमस्वरूपी कर्मचारी होऊ या आशेवर ते काम करत होते. मात्र, एजन्सीला काम देण्यात आले, त्यांनी पगार रोखला. तोही आठ महिन्यापासून याची तक्रार नगरपरिषद प्रशासनास करावी तर ते एजन्सीकडे बोट करतायात. एजन्सी दाद लागू देतच नाही. घरातील दोन मुले, बायको यांचा संसार कसा चालवाव याची चिंता त्यांना होती. त्यांच्या सारखीच अनेक कर्मचाऱ्यांची  अवस्थता आहे. यातून त्यांनी आत्महत्या केली. दत्ता गायकवाड यानी निलंगा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. मुख्याधिकारी, कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies