आटपाडी : आटपाडी तालुक्यातील पिसेवाडी व आवळाई गावच्या हद्दीतील टेंभू योजनेच्या बंदिस्त पाइपलाइनचे काम चार महिन्यापूर्वी पूर्ण झाले आहे. तरी ही अजून बंदिस्त पाइपलाइन मधून टेंभू योजनेचे पाणी सोडले नाही.
त्यामुळे बंदिस्त पाइपलाइन मधून टेंभू योजनेचे पाणी सोडण्यासाठी तानाजी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आवळाई गावचे सरपंच, बाबुदादा जाधव, सदस्य, ज्ञानेश्र्वर पिसे, मा. सरपंच, विलास बिटे, नवनाथ कदम, अंकुश सावळकर, बाळासाहेब मोटे, निंबवडे, सचिन मोटे, यांनी विटा येथे, आमदार, अनिलभाऊ बाबर यांची भेट घेतली. तसेच विविध विकास कामावर चर्चा करण्यात आली आहे.