Type Here to Get Search Results !

“कामचुकार मंत्री वडेट्टीवार यांचा ताबडतोब राजीनामा घ्या” ; चित्रा वाघ




रत्नागिरी : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आणि ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर बोलतच नाहीत व बोलणारे मंत्री विजय वडेट्टीवार फसवणूक करत आहेत.ओबीसी मंत्री वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी आयोग गठित करतो, असे सांगितले. ५ दिवसांपूर्वी आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, असे जाहीर केले. परंतु आता कालच निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या सरकारला ओबीसींचे आरक्षण काढूनच घ्यायचे. फसवे, कामचुकार मंत्री वडेट्टीवार यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, वडेट्टीवार यांचा ताबडतोब राजीनामा घेत मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी,  मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.

या वेळी वाघ म्हणाल्या की, आरक्षण रद्द झाले ते या नाकर्त्या सरकारमुळेच. न्यायालयाने १५ महिने दिलेले असूनही मागासवर्ग आयोग गठित केला नाही. डाटा दिला नाही. यात सरकारने जराही स्वारस्य दाखवले नाही. सत्तेतले मंत्रीच चिंतन बैठका घेत आहेत, आंदोलन करत आहेत. कसले आणि कोणाविरुद्ध करत आहेत. आयोग करण्यासाठीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे धुळ खात पडली होती. सर्व मंत्र्यांनी एकत्र येऊन आयोग गठित करायला हवा होता, असे त्या म्हणाल्या.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies