आटपाडी : आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील दोन सख्या भावा सह चुलत भाऊ असे तिघे जांभूळणी येथील ओढ्यावरती असणाऱ्या बंधाऱ्यात वाहुन गेल्याची दुर्देवी घटना काल दिनांक ०६ रोजी घडली सायंकाळी घडली असून याबाबत याठिकाणी अजूनही शोधकार्य चालू आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, घाणंद येथील विजय अंकुश होनमाने (व.व.१५) व आनंद अंकुश होनमाने (व.व. १६) तसेच त्यांचा चुलत भाऊ वैभव लहू होनमाने (व.व. १७)हे सायंकाळच्या सुमारास जांभूळणी हद्दीतील असणाऱ्या बंधाऱ्यावरती माणसे पकडण्यासाठी गेले असल्याची चर्चा आहे. त्यांच्या बरोबर त्यांचा लाडका कुत्रा देखील होता.
घटना घडलेल्या ठिकाणी शोध कार्य स्थानिक पातळीवर सुरु आहे. परंतु पाण्याची खोली मोठी असून बंधाऱ्याच्या आतमध्ये ठिकाणी-ठिकाणी चिलारीच्या झाडीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्याचबरोबर पाण्याचा प्रवाह देखील मोठा आहे. त्यामुळे अडथळा निर्माण होत आहे. सध्या टेंभू योजनेचा पाणी बंद करण्यात आले आहे.
याठिकाणी रेस्क्यू टीम बोलविण्यात आली असून काल रात्री २.० वाजेपर्यंत शोधमोहीम सुरु होती. परंतु कोणताही या मुलांचा थांगपत्ता लागलेला नव्हता. आज सकाळीपासून शोधमोहीम पुन्हा सुरु करण्यात आली असून सकाळी ७.२७ पर्यंत रेस्क्यू टीम ला यश आले नाही. याठिकाणी घाणंद गावाचे सरपंच नितीन होनमाने, यांच्याबरोबर स्थनिक पातळीवरील अधिकारी, पदाधिकारी या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस