मुंबई राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेला एक निर्णय मुख्यमंत्र्यांनी स्थगित केला आणि त्यावर विरोधकांकडून निशाणा साधला जाऊ लागला. जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांनी स्थगित केल्यामुळे त्याला सत्ताधाऱ्यांमध्ये विसंवाद असल्याचं स्वरूप दिलं जाऊ लागलं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोणताही कॅन्सरचा पेशंट तिथे राहणार नाही. रुग्ण टाटामध्ये दाखल झाल्यानंतर दोन-तीन महिने उपचार चालतात. त्याचे नातेवाईक तिथे येत असतात. ते ज्या अवस्थेत राहतात, ती अवस्था माणुसकीला धरून नाही. म्हणून त्यांना आपण घरं दिली, तर आपल्याकडून एक मानवी सेवा होईल, या दृष्टीने तो प्रयत्न होता. कॅन्सरचे पेशंट तिथे राहतील, हे मत पूर्णपणे चुकीचं आहे. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. बाहेर गावाहून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी, या एकाच उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्देवाची बाब आहे”, असं आव्हाड म्हणाले आहेत.