म्हसवड/अहमद मुल्ला : कोरोनाच्या साथीच्या संकटामुळे शासनाने लॉकडाऊन जाहिर केला. परिणामी येथील विविध व्यवसाय बंद राहिले, नागरिकांना रोजगारासही मुकावे लागले. आर्थिक मेटाकुटीस आलेल्या नागरिकांच्या घर मिळकतीचे वर्षाची घरपट्टी आणि नळपाणीपट्टी थकीत दंड रक्कमेसह पालिकेने सहानभूतीने माफ करावी अशी मागणी येथील "म्हसवड जागरूक नागरिक मंच' च्या वतीने पालिका मुख्याधिकारी डॉ.सचिन माने यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गत वर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या साथीचे संकट आले. या महामारीचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहिर केला होता. व सध्याही लॉकडाऊन सुरु आहे. परिणामी सर्व व्यवसाय व रोजगाराचे मार्गच बंद झाल्यामुळे सामान्यासह इतर कुटुंबाचे आर्थिक उत्पन्नच थप्प झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन आर्थिक तंगी व कर्जबाजारी होऊन सामान्य कुटुंबे मेटाकुटीस आली आहेत. अनेकांच्या कायम नोकऱ्यासह खात्राचे रोजगारासही मुकावे लागले.
म्हसवड पालिका हद्दीतील बहुतांश कुटुंबे गरीब असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खुपच बिकट झालेली आहे.अनेक कुटुंबात कोरोनाच्या साथीची लागण झाली या महामारीत कुटुंबातील कर्त्याना जीव गमविण्याच्या संकटाचा सामना करावा लागला. इतर गावोगावीही याहून वेगळी अशी परिस्थिती नाही. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी नागरिकांना मदत व्हावी म्हणून आपल्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले सातारा पालिकेने घरपट्टी माफ करुन कोरोनाच्या साथीच्या संकटात खारीच्या वाट्याच्या मदतीचा हात देण्याचे मोठे योगदान दिले आहे.
याच धर्तीवर येथील नागरिकांना आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मदत व्हावी यासाठी म्हसवड पालिकेने देखील घरपट्टी थकीत दंड रक्कमेसह माफ करावी तसेच नागरिकांना २४ तास राहिले किमान दररोज एकवेळ पाणी पुरवठा करणे पालिकेचे कर्तव्य असताना महिन्यातून फक्त चार ते पाच वेळा विभागवार पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे लॉकडाईन कालावधीत रात्रंदिवस प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्य घरीच मुक्कामी राहिले असताना सर्वच कुटुंबाना पाणी टंचाईचा सामना करावा लागला.
पालिकेने पाणीपट्टीही थकीत दंड रक्कमेसह माफ करून नागरिकांना थोडासा दिलासा दिला तर कोरोना साथीत व लॉकडाऊन मुळे आर्थिक टंचाई व कर्ज बाजारीपणा मुळे मेटाकुटीस आलेल्या नागरिकांना नव्याने उभारी घेण्यासाठी, त्यांच्यामध्ये बळ निर्माण करण्यासाठी तसेच शहराची विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत होण्यासाठी पालिकेची नक्कीच मदत होईल.यासाठी पालिकेने घरपट्टी व पाणी पट्टी माफीचा उचित असा निर्णय त्वरित घेण्याची विनंती पालिका मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस