Type Here to Get Search Results !

दिव्यांग व्यक्तींना मिळणार मुंबईत हक्काचे घर



मुंबई : मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या यादीत आता दिव्यांग व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे. म्हाडाच्या लॉटरीमध्ये 5 टक्के घरं दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव असणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.


मुंबईत प्रत्येकाचे हक्काचे घर असावे, यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. त्यातच म्हाडाची लॉटरी सर्वात परवडणारी अशीच असते. दिव्यांग व्यक्तींनाही या लॉटरीत सहभागी होता यावे म्हणून आता दिव्यांग प्रवर्गाची घोषणा करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टवीट करून याबद्दल माहिती दिली आहे.


’म्हाडा लॉटरी मध्ये आता 5 टक्के घरे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवले जाणार आहे, गृहनिर्माण विभागातील सर्व प्रकल्प निर्णय लागू असेल’, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.


त्याचबरोबर, गृहनिर्माण मंत्रालयाच्या म्हाडा तर्फे उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पातील 5 टक्के घरे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या भविष्यात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू असणार आहे, असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies