Type Here to Get Search Results !

एसव्हीएस कंपनी आग प्रकरण : लोकांची ओळख पटवणे अवघड, डीएनए चाचणी करूनच मृतदेह ताब्यात देणार



पुणे : मुळशी तालुक्यातील पिरंगुड येथील उरवडे येथील एसव्हीएस कंपनीत लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख पटवणे कठीण आहे. मृत नातेवाईकांचा डीएनए करूनच मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे. यासाठी तीन दिवस लागणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.


झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून आग कशामुळे लागली याचे कारण शोधण्यासाठी विभागीय अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आहे. आज चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर आगीचे कारण स्पष्ट होऊन त्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती देखील यावेळी गृहमंत्र्यांनी दिली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies