नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला तीन कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये तीन लाख ९० हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ५० हजार ८४८ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. तर १३५८ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. तसेच सलग ४१ दिवस नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ६८ हजार ८१७ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.