आटपाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाय म्हणून राज्य सरकारने आषाडी वारी साठी पायी चालत जाणऱ्या पालख्यांना परवानगी नाकारली आहे. राज्यातील फक्त १० मानाच्या पालख्यांना बस मधून नेण्यास परवानगी दिली. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडून महाविकास आघाडीकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. परंतु सरकार मात्र यावर ठाम आहे.
पहा : व्हिडीओ
त्यामुळे आता सरकारच्या या निर्णयावर भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील जोरदार टीका केली असून ३ जुलै रोजी आळंदी येथील पायी निघणाऱ्या वारी मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, वारी व्हावी म्हणुन छत्रपती संभाजी महाराजांनी वारीला औरंगजेबाच्या काळात सरंक्षण दिले होते. परंतु ‘सोनिया' सेनेचे अध्यक्ष नाव महाराजांचे घेतात काम मात्र औरंगजेबाचं करतात. वारकरी कोविडचे सर्व नियम पाळून शिस्तीने पायी वारीसाठी तयार असताना सुद्धा हे ठाकरे सरकार कुणाच्या दबावाखाली या शेकडो वर्ष चालत आलेल्या हिंदू परंपरेत ख्वाडा घालतंय? म्हणून ३ जुलै रोजी आळंदी ते पंढरपूर निघणाऱ्या माझी वारी माझी जबाबदारी मध्ये एक वारकरी म्हणून सहभागी होणार आहेत.