नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहेत. गेल्या 91 दिवसात पहिल्यांदाच नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 43 हजारांच्या खाली गेला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 640 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 167 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 81 हजार 839 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 99 लाख 77 हजार 861 वर गेला आहे.