नवी दिल्ली : देशात नव्या कोरोंनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याने कोरोंनाचा धोका कमी झाल्याचे दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत भारतात १४,३१३ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर मृत्यूंची संख्याही कमी झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ५४९ करोनाबाधितांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
गेल्या २४ तासांत १३,५४३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत करोनामधून बरे झालेल्या लोकांची संख्या ३,३६,४१,१७५ झाली आहे.