खानापुर/प्रतिनिधी : आज मौजे बेणापूर येथे ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व चक्रवर्ती सम्राट अशोक विजया दशमी दिवस अतिशय आनंदात व उत्साहात करण्यात आला.
शासनाने नुकतीच सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचा आदेश दिला. तरीही कोरोनाचे निर्बंध पाळत हा सोहळा पार पाडण्यात आला. प्रथम सर्व उपस्थित धम्म बांधवांनी महामानवांना पुष्पहार अर्पण करुन पुजा करण्यात आली.
यावेळी गणेश धेंडे यांनी धम्मदेसना देत धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे व सम्राट अशोका विजया दशमीचे माहात्म्य उपस्थितांना सांगत, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धम्म हा मानव मुक्तीचा मार्ग आहे, तो सर्वांनी समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे त्याचबरोबर महापुरुषांचे विचार समजून घेऊन ते आचरणात आणले पाहिजेत असे सांगितले. यानंतर सिद्धेश्वर धेंडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी दर रविवारी समाज मंदिरात पुजा घेण्याचाही निश्चय करण्यात आला.
याप्रसंगी, सुर्याजी धेंडे, धोंडीराम धेंडे, भरत उघाडे, संजय साबळे, नानासाहेब धेंडे, संदिप धेंडे, अमित धेंडे, स्वप्निल वाघमारे, रुपेश गायकवाड, सुरज वाघमारे, सुरज धेंडे, निखील वाघमारे व धम्म बांधव उपस्थित होते.