आटपाडी : येथील शेटफळे चौकातील बंदिस्त गटारी तुंबल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून सदरच्या तुंबलेल्या बंदिस्त गटारी दुरुस्त करण्यात याव्यात, अन्यथा ग्रामपंचायतीच्या विरोधातआंदोलन करण्याचा इशारा युवा नेते रणजीत ऐवळे-पाटील यांनी दिला आहे.
आटपाडी शहरातील शेटफळे चौक येथून दिघंची-हेरवाड या राज्यमार्ग गेला आहे. या ठिकाणी राजपथ कंपनीच्या वतीने या राज्य मार्गाचे काम करण्यात आले आहे. चौकाच्या सुरुवातीला बंदिस्त गटार केली आहे. परंतु सदरची गटर हि तुंबलेली असल्याने या ठिकाणी साथीच्या रोगांचा फैलाव होण्याची मोठी शक्यता आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाने सदरची गटार हि दुरुस्त करून ती वाहती करण्याची गरज आहे.
या गटारीवर येथील स्थानिकांनी मातीचा भराव टाकल्याने ती वाहती होण्याऐवजी संपूर्णपणे मुजून गेली आहे. त्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहणार आहे. तरी ग्रामपंचायतीने सदरची गटर दुरुस्त करून गटारीवर झालेले अतिक्रमण काढून टाकावे अन्यथा नाईलाजाने ग्रामपंचायतीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा युवा नेते रणजीत ऐवळे-पाटील यांनी दिला आहे.