पुणे : करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने महाविद्यालये-विद्यापीठे बंद करून ऑनलाइन पद्धतीने अध्यापन आणि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ७०%विद्यार्थ्यांचे अद्याप परीक्षा अर्ज भरलेले असून ३०% विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरलेले नाहीत.
महाविद्यालये, विद्यापीठे सुरू झाल्याने विद्यापीठाकडून ऑफलाइन परीक्षांचा विचार करण्यात येत होता, पण अध्यापन ऑनलाइन झाल्याने परीक्षाही ऑनलाइनच घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यामुळे परीक्षा पद्धत ठरवण्यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी समिती आयोजित केली. या समितीने अंतिम वर्ष आणि विषम सत्राच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने आणि अन्य वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मागणी केली. मात्र गेल्या काही दिवसांत करोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याने विद्यापीठाने सावधगिरीची भूमिका घेत शासनाच्या नव्या निर्बंधांची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्य शासनाने महाविद्यालये, विद्यापीठे बंद करून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा, अध्यापन करण्याचा आदेश दिला आहे.