दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नावळी, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिसर मोरी ही १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करवी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली होती. १४ गावांमध्ये ग्रामपंचायत असल्याने वाढत्या नागरिकीकरणानुसार गावात सुविधा पुरवू शकत नाहीत.
शहरीकरण झपाटय़ाने वाढत असल्याने हा विकास गावातही व्हावा म्हणून अशी मागणी येथील ग्रामस्थानी केली होती. काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांच्या विरोधामुळे ही गावे महापालिकेतून गाळली होती. परंतु, त्यानंतर ती पुन्हा सहभागी करण्याच्या प्रक्रिया सुरू केल्या होत्या. त्यानंतर आज यासंबंधी निर्णय झाला असून नवी मुंबई परिसरातील १४ गावांचा नवी मुंबईत महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय झाला आहे.