Type Here to Get Search Results !

नवी मुंबई परिसरातील “हि” १४ गावे महापालिकेत समाविष्ट!

 







नवी मुंबई: नवी मुंबई परिसरातील १४ गावांचा नवी मुंबईत समाविष्ट करण्याबाबतचा  निर्णय झाला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिन्याभरापूर्वी सर्व तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आज यासंबंधी निर्णय झाला आहे.


दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नावळी, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिसर मोरी ही १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करवी  अशी मागणी अनेक वर्षांपासून केली  होती. १४ गावांमध्ये ग्रामपंचायत असल्याने वाढत्या नागरिकीकरणानुसार गावात सुविधा पुरवू शकत नाहीत. 



शहरीकरण झपाटय़ाने वाढत असल्याने हा विकास गावातही व्हावा म्हणून अशी मागणी येथील ग्रामस्थानी केली होती. काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांच्या विरोधामुळे ही गावे महापालिकेतून गाळली होती. परंतु, त्यानंतर ती पुन्हा सहभागी करण्याच्या प्रक्रिया सुरू केल्या  होत्या. त्यानंतर आज यासंबंधी निर्णय झाला असून नवी मुंबई परिसरातील १४ गावांचा नवी मुंबईत महापालिकेत  समाविष्ट करण्याबाबतचा  निर्णय झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies