जगभरातील देशांना करोना महामारीच्या संकटात आणणाऱ्या चीनमध्ये सध्या या संसर्गाने जोरदार कहर माजवला आहे . चीनमध्ये गेल्या दोन वर्षांतील सर्वांत मोठी रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. गेल्या शनिवारी चीनमध्ये करोना विषाणूच्या दैनंदिन प्रकरणांची नोंद झाली, जी दोन वर्षांतील सर्वाधिक संख्या असून , यानंतर चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाउन लावण्यात आला आहे. त्यामुळे चीनमध्ये लॉकडाउन लावण्यात आल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सूचना दिली आहे.
चीनमध्ये करोना रुग्णसंख्या वाढत असून लॉकडाउन लावण्यात आल्यासंबंधी विचारले असता राजेश टोपे यांनी सांगितले की, “आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका घेतली पाहिजे. आपण काळजी घेतली पाहिजे. जगभरात करोनाची चौथी लाट दिसत आहे त्यातून शिकवण घेण्याची गरज आहे. निष्काळजीपणे वागने चुकीचे आहे आणि त्याची परवानगी नाही. लोकांनी सतर्क राहिले पाहिजे”.
तसेच, “मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत चर्चा सध्या करणार नाही. करोना अजून संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी निर्बंधांचे पालन करावे. मास्क लोकांनी घातलाच पाहिजे”, असे म्हणत त्यांनी सुचना दिली आहे.
देशात दोन वर्षांपूर्वी करोनाचा शिरकाव लागू करण्यात आलेले सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध ३१ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आह़े करोना रुग्णसंख्येत मोठी कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला होता देशात दोन वर्षांपूर्वी करोनाच्या शिरकावानंतर लागू करण्यात आलेले सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध ३१ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. करोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असला तरी मुखपट्टीचा वापर आणि अंतरनियमाचे पालन यापुढेही करावे लागणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले.