बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. लवकरच आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तसेच,अभिनेता कमाल आर खानने त्याच्या एका जुन्या विधानाबाबत ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. “आमिर खानने आपण खरा देशभक्त असल्याचे सिद्ध केले. त्यांची पत्नी म्हणाली होती की, देशात भीती वाटते… देश सोडून जाऊया. भाईने पत्नी सोडली, पण देश सोडला नाही.” असे केआरके म्हणाला आहे.
आमिर खान ने साबित कर दिया है, कि वो सच्चा देशभक्त है!
— KRK (@kamaalrkhan) March 22, 2022
उसकी बीवी ने बोला था, कि देश में डर लगता है! देश छोड़ दो!
भाई ने बीवी छोड़ दी, लेकिन देश नहीं छोड़ा😜
२०१५ मध्ये आमिरने देशातील असहिष्णुतेवरून मोदी सरकारवर भाष्य केले होते. यामुळे त्याची पत्नी किरण राव हिनेही त्याला देश सोडून जाऊया असे सांगितले होते. तसेच, आमिर आणि किरणचा ३ जुलै २०२१ रोजी घटस्फोट झाला. तर आमिरचे हे दुसरे लग्न होते. लग्नाच्या १६ वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला आणि ते वेगळे झाले .