रायगड: रायगड जिल्ह्यातील खोपोलीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर पलटी झाला, त्यामुळे महामार्गावर २-३ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी खोपोली हद्दीतील अमृतांजन ब्रिजच्या खाली मुंबईकडे येणारा केमिकल टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती.
केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या दोन मार्गांपैकी एका मार्गावर टँकर पलटी झाल्याने ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती . त्यामुळे घटनेची माहिती मिळताच वाहतुक पोलीस, डेल्टा फोर्स, खोपोली पोलीसांनी मदत कार्य सुरू केले आहे.
या अपघातानंतर अमृतांजन ब्रिज ते आडोशी टनेलपर्यंत पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, सध्या रस्त्यावर सांडलेले केमिकल कर्मचार्यांच्या मदतीने साफ करण्यात आले असून मुंबई-पुणे एक्सप्रेस वर वाहतूक सुरळीत चालू झाली आहे.