Type Here to Get Search Results !

चेन्नईचे तीन गडी बाद; चेन्नईच्या फक्त “इतक्या” धावा!





क्रिकेट चाहते मागील वर्षभरापासून ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आलाच  आहे. आजपासून आयपीएल क्रिकेटच्या १५ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात एकूण १० संघ एकमेकांशी भिडणार आहेत. दोन संघ वाढल्यामुळे यावेळी सामन्यांची संख्यादेखील वाढवण्यात आली आहे.



गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा पहिला सामना खेळवला जात आहे. केकेआरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. केकेआर टीम श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात चेन्नईशी दोन हात करते आहे. तर धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व रविंद्र जाडेजा करत असून हा सामना जिंकून स्वत:ला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान जाडेजापुढे आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.




तसेच, कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकला आहे. आणि चेन्नईला ऋतुराज गायकवाडच्या रुपात पहिला जोरदार झटका बसला आहे.व तसाच दुसरा झटका बसला असून डेव्हॉन कॉन्वे फक्त ३ धावांवर बाद झाला आहे. ३० धावसंख्येच्या आत चेन्नईचे दोन गडी बाद झाले असून ही चेन्नईसाठी चिंताजनक बाब असल्याचे समोर येत आहे. त्याचप्रमाणे, रॉबिन उथप्पाच्या रुपाने चेन्नईला तिसरा झटका बसला आहे. चेन्नईची दयनीय स्थिती झाली असून आतापर्यंत चेन्नईच्या फक्त ५२ धावा झाल्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies