आटपाडी: प्रत्येकाला आपले केस सुंदर, लांब आणि दात हवे असतात ,परंतु केस गळण्याची आणि पातळ होण्याच्या समस्येने अनेक लोक खूप त्रासलेले असतात.
केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट वापरल्याने केस खराब होतात. आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे हेअर केअर प्रोडक्ट्स वापरल्यामुळे केस खराब तर होतातच पण सोबतच केस गळून केस पातळ होतात .
तसेच, जास्त शॅम्पू केल्याने केस पातळ होऊ शकतात. शॅम्पूमध्ये केमिकलचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे शॅम्पूचा जास्त प्रमाणात वापर केल्यास केस पातळ तर होतातच पण गळूही लागतात.
त्याचप्रमाणे, शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याने देखील केस अधिक गळून पातळ होतात. यासाठी महिलांनी सकाळी सूर्यप्रकाश घेणे आवश्यक आहे. तसेच सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात न घेतल्याने शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते, त्यामुळे केस पातळ तर होतातच तसेच गळूही लागतात. अन्नामध्ये आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असताना देखील केस गळण्याच्या समस्या उद्भवू शकतात.