Type Here to Get Search Results !

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यात शासनाला अपयश.



मुंबई : दिवाळीत सुरू झालेल्या टी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघाला नाही. मागच्या तीन महिन्यांपासून सरकार आणि एसटी संपकरी याच्यांत कित्येक चर्चा पार पडल्या पण यातून संपकऱ्यांच्या काही मागण्या मान्य न झाल्याने संपकरी अजुनही आपल्या भुमिकेवर ठाम आहेत. आज अनिल परब यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या भाषणामध्ये एसटी संपावर भाष्य केले.


मागच्य तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यावर तोडगा काढण्यास सरकार अपयशी ठरले असल्याची खंत व्यक्त केली. मागच्या तीन महिन्यात संपाबाबत झालेल्या घडामोडींचा आढावा परब यांनी घेतला. ते म्हणाले की, दिवाळीच्या तोंडावर लोकांना त्रास होऊ नये म्हणून मी कोर्टात गेलो. कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचे आवाहन केले. दोन वर्षे कोरोनामुळे बोनस दिला नव्हता.


मात्र यंदा मी बोनस देण्याचा निर्णय घेतला. हे सगळे सुरू असताना कोर्टाच्या आदेशानंतर एक एक डेपो बंद होत गेला. त्यानंतर मी पुन्हा कोर्टात गेलो, म्हणत परबांनी संप सुरु व्हायच्या आधीपासून ते आतापर्यंतच्या घटनाक्रमाची माहिती दिली. अनिल परब यांची पडळकर आणि खोत यांच्यासोबतची चर्चा अयशस्वी ठरली. तरीही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिले. यांच्या मागणीचा आम्ही अभ्यास करतो होतो. त्यानंतर पगार शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराजवळ नेऊन ठेवला. सरकारने वेळेवर पगाराचीही जबाबदारी घेतली. नोकरीवरून काढण्याचा तर कुणाला प्रश्नच नव्हता. पण तेव्हा दुर्दैवाने पडळकर आणि खोत यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. कामगारांनी नवा नेता निवडूण संप सुरूच ठेवला. शासनाला हे संप मिटवण्यात अपयश आले. असे म्हणत परबांनी पूर्ण हकीकत सांगितली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies