नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ककरौला या भागात विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद होऊन हल्ला झालाआहे . यामध्ये 16 वर्षीय विद्यार्थ्याचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. एका गटातील हल्लेखोर विद्यार्थ्यांनी दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांवर गोळी झाडली होती. गोळी चेहऱ्यावर लागून गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी छापेमारी केली जात आहे. गँगवॉरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. त्यामुळे सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची धरपकड करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल म्हणजेच, शनिवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान ककरौलामधील सरकारी शाळेबाहेर गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्याला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले,परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान पोलीस या सर्व घटनेचा शोध घेत आहेत.